राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९६८ रोजी मध्यप्रदेशातील शुजालपुर येथे झाला होता. अध्यात्माची लहानपणापासूनच त्यांना आवड होती. घोडस्वारी आणि तलवारबाजीतही ते पारंगत होते. सुरवातीच्या काळात मुंबईत एका खाजगी कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी काही दिवस मॉडेलिंगचे काम केले. परंतु, अध्यात्माची ओढ असल्याने त्यांचे मन दुसऱ्या क्षेत्रात रमत नव्हते. पुढे त्यांनी धार्मिक ट्रस्ट चालवण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रसंत भय्यूजी महाराजांनी श्री सद्गुरू दत्त धर्मिक ,परमार्थिक ट्रस्ट, सूर्योदय परिवारची स्थापन केली
सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून महाराजांनी कृषी क्षेत्र , राजकीय, सामाजिक, धार्मिक ,सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम केल. त्याचप्रमाणे मानव जातीच्या पल्याड जावून प्राणी मात्राचं सुद्धा कल्याण झाल पाहिजे व त्याचबरोबर वृक्ष संवर्धन झाल पाहिजे यासाठी त्यांनी विविध उपाययोजना केल्या उपक्रम राबविले त्याचप्रमाणे दुष्काळमुक्तीसह आत्महत्याग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी मोठे कार्य उभे केले.
असंख्य अनाथ मुलांना त्यांनी दत्तक घेतले. खामगाव तालुक्यात त्यांनी जवळपास ७०० मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची सोय केली. पारध्यांच्या मुलांनी परंपरागत व्यवसायात न जाता शिक्षण घ्यावे व मुख्य प्रवाहात यावे यासाठी त्यांनी मोठे कार्य सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून उभे केले. त्यांनी आश्रमशाळा चालवल्या, बालसुधारगृहे चालवली, एड्सग्रस्त मुलांचे पालकत्व स्वीकारले. तसेच कोपर्डीला उपलब्ध करून दिलेली मुलींसाठी मोफत बससेवा, सर्व धर्मिय सामुदायिक विवाह, वंचितांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे,छ.शिवाजी महाराज ,छ.संभाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी मदत करणे.
तसेच राष्ट्रसंत भय्यू महाराजांनी १८ लाख झाडे लावली होती. आदिवासी जिल्ह्यात १ हजार विहिरी खोदल्या होत्या. सत्कार करताना ते नारळ, शॉल किंवा फुलांचा स्वीकार करत नसत. यावर पैसे खर्च करण्यापेक्षा हे पैसे शिक्षणावर खर्च करायला हवेत असं ते नेहमी म्हणत. या पैशातून त्यांनी जवळपास १० हजार मुलांना शिष्यवृत्ती दिली होती.
राष्ट्रसंत भैय्यूजी महाराजांनी शेतक-यांना केंद्रबिंदु माणुन त्यांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले. सत्संग,अध्यात्मासोबतच विज्ञानाची जोड घालुन त्यांनी हजारो शेतकरी, आदिवासी, युवक, महिला भगिणी यांचे जिवनमान उंचाविले. त्यांचे व्यक्तीमत्व नेहमीच उर्जा प्रदान करणारे होते. महाराजांनी अनेकांना जिवन जगण्याचा मंत्र दिला. राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांचे कार्य हे दिपस्तंभासारखे आहे भैय्यूजी महाराजांचा सामाजिक कार्याचा व्याप मोठा होता .
आध्यात्मिक, सामाजिक कार्यातून समाज सुधारणेचे कार्य त्यांनी सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून केले. त्यांना मध्य प्रदेश सरकारने देऊ केलेलं राज्यमंत्रीपद त्यांनी नाकारले होते नाकारण्यामागील कारण म्हणजे महाराज नेहमी म्हणत असत कि धर्मसत्तेने आपल काम कराव व राज्य सत्तेने आपल काम कराव अस त्याचं मत होत. भय्यूजी महाराज कधीच भगवी वस्त्र परिधान करून आणि मोठी दाढी-मिशा ठेवून किंवा जटा वाढवून वावरले नाहीत. ते त्यांना मान्य नव्हते. माणसाने आनंदात राहावे, दुसऱ्यांना आनंद वाटावा असे जगावे व जगू द्यावे ही त्यांची धारणा होती. समाजिक दायीत्वाचे जान व भान असेल्या या राष्ट्रसंतास व त्यांच्या समर्पित जीवन कार्याला माझे कोटी कोटी प्रणाम.....!! लेखक : साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण संपर्क :9011890279

Post a Comment

Previous Post Next Post